मा.मुख्यमंत्री यांच्या समवेत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर संप पुढील आदेशापर्यंत स्थगित
राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना प्रतिनिधींची आज दुपारी आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली.
१) चर्चेत १ नोव्हेंबर २००५ पूर्वी टप्पा अनुदानवर असलेल्या व २००५ नंतर १००% अनुदान आलेल्या २६००० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली.
२) २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना आलेल्या अहवालाचा अभ्यास करून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेन्शन योजनेबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
३) १०-२०-३० बाबत शिक्षण विभागास निर्देश येतील. तसेच इतर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मिळाल्याने आजपासून सुरू असलेला संप संस्थागित करण्यात आला आहे.
तरी उद्या पासून आपल्या कामावर रुजू व्हावे.....